Sunday, April 11, 2010

मराठीचा अभिमन्यू!

दुसऱ्या भाषिकांपुढे आपल्या भाषेला सिद्ध करण्यापेक्षा आधी मराठी माणसाला तिच्यावर प्रेम करायला शिकवण्याची वेळ आली आली आहे हि एक शोकांतिका आहे.अशा काळात जे स्वतःला खरच शहाणे समजतात त्यांनी भाषा कशी समृद्ध करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. आपण काही योगदान देतोय का? आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

इंग्रजी माध्यमांच्या वाढत्या शाळा हे आजच्या महाराष्टाचे दुर्दैव नाही का? विज्ञान शाखेचे पूर्ण ज्ञान मराठीत नाही,चांगले पैसे देणाऱ्या नोकऱ्या इंग्रजीचे ज्ञान असल्याशिवाय मिळत नाहित त्यामुळे झक मारत आम्ही इंग्रजीतून शिकतो.

आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याची चैन कर्जांची टांगती तलवार डोक्यावर वागवणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या खिशाला परवडणारी नाही.दुर्दैवाने कित्येकासाठी हे परीस्थितीने लादलेले गाढवओझे ओढले जात नाही.मग आम्हीच आमच्या देशात तथाकथित 'non-eligible' ठरतो.हि आपल्याच घरात होणारी आपली कुचंबना नाही का? 'तोंड दाबून बुक्क्यांचा मार का आणि कुठवर सोसायचा?

एका प्रश्नाचा हात धरून दुसरा,दुसऱ्याचा हात धरून तिसरा.प्रश्नांच्या या भोवऱ्यात आजच्या मराठी माणसाचा अभिमन्यू होत आहे.प्रश्न उदंड आहेत अन दुर्दैवाने उत्तरे खूप कमी. माणूस म्हणून प्रत्येकाला मर्यादा असतात पण तरीही जर कुणी काही प्रश्नांना का होईना त्याच्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला प्रोत्साहन दिलं तर बिघडलं कुठे? काही देण्यासाठी पुढे न सरसावणारे हात नुसत्या टाळ्याही वाजवू शकत नाहीत का?

No comments:

Post a Comment